“शेतकर्यांचा न्याय हक्कासाठी”आर्णी तहसील कार्यालया समोर आमरण उपोषण….
आर्णी तालुक्यातील मौजे आसरा येथील शेतकरी बांधवांनी आपल्या प्रमुख मागन्यासाठी आज दिनांक ८/१०/२४ रोज मंगळवार पासुन आर्णी तहसील कार्यालया पुढे आमरण उपोषणाला सुरूवात केली आहे.प्रमुख मागन्या मध्ये सन २०२३/२०२४ मधील अतीवुष्टीचे आनुदान आधाप मीळाले नाही. सन २०२३/२०२४ मधील खरडीचेही अनुदान मीळाले नसुन माहे मार्च,एप्रील २०२४ मध्ये गारपीटने झालेल्या तीळ,गहु व ईतर पीकांची आतोनात नुकसान झाल्या नंतर ही त्याची भरपाई आधाप ही मीळत नसल्याने व या सर्व बाबीमध्ये दिरंगाई करनार्या आसरा येथील तलाठ्यांची बदली करन्याचे काम शासनाने त्वरीत करावे या साठी आज दीनांक ८/१०/२०२४ रोज मंगळवार आर्णी तालुक्यातील मौजे आसरा येथील शेतकरी बांधवांनी आपला न्याय हक्कासाठी आर्णी तहसील कार्यालया समोर आमरण उपोषणा करीता बसले आहे.या उपोषणात मौजे आसरा येथील ग्रा.वि.सो.चे अध्यक्ष राधेशाम वानखडे,तंटामुक्ती समिती अध्यक्ष गणेश गो.वानखडे,ग्रा.प.उपसरपंच नरेन्र्दें चव्हाण,दिनेश मांडोळे सह ईतर शेतकरी बांधव उपोषणाला बसले आहे…..