Homeताज्या बातम्याजिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्या

जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्या

*जिल्ह्यात कुठेही आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घ्या*

 

– अनिल खंडागळे

 

*आदर्श आचारसंहितेबाबत आढावा बैठक*

 

यवतमाळ, दि. 16 : भारत निवडणूक आयोगाच्यावतीने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. घोषणेनंतर लगेचच आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. जिल्ह्यात कोठेही आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची प्रत्येक विभागाने दक्षता घ्यावी, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांनी दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवन येथे त्यांनी आदर्श आचारसंहितेबाबत आढावा बैठक घेतली. बैठकीला श्री.खंडागळे यांच्यासह उपवनसंरक्षक धनंजय वायभासे, अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक पियुष जगताप, निवडणूक उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर, वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता श्री.दरोळी, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी राजेश देवते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.सुखदेव राठोड, जिल्हा पुरवठा अधिकारी सुधाकर पवार यांच्यासह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

 

आचारसंहिता लागल्यानंतर सर्व प्रकारचे राजकीय बॅनर, पोष्टर, होर्डिंग, कटआऊट, जाहिराती काढून टाकण्याचे निर्देश आहे. त्याप्रमाणे शासकीय व खाजगी ईमारतींवरील राजकीय जाहिराती, फोटो काढणे आवश्यक असून त्यासाठी आयोगाने कालावधी निश्चित करून दिला आहे. या कालावधीत आतापर्यंत करण्यात आलेली कारवाई व पुढे करावयाच्या कारवाईची माहिती त्यांनी घेतली. कालमर्यादेत या बाबींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले.

 

कोणत्याही प्रकारचे पोष्टर, बॅनर, कटआऊट यापुढे पुर्व परवानगीशिवाय लावल्या जावू नये, असे निदर्शनास आल्यास आयोगाच्या निर्देशाप्रमाणे योग्य कारवाई केली जावी. शासकीय ईमारतींवर प्रचार करणे प्रतिबंधात्मक आहे. खाजगी ईमारतीवर देखील राजकीय स्वरूपाचे काही लावावयाचे असल्यास स्थानिक संस्था व ईमारत मालकाची परवानगी आवश्यक आहे. जी शासकीय कामे सुरु आहे, तेवढीच सुरु ठेवता येतील. जी कामे सुरुच झाली नाही, अशी कामे करता येणार नाही.

 

अतितातडीने करावयाची कामे पुर्व परवानगीने केली जावी. यापुढे कोणतेही काम करतांना विभागांनी आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची खात्री व पुर्व परवनागीनेच करावे, असे निर्देश बैठकीत देण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

इंग्लंड वि इंग्लंडच्या कसोटी पथकासाठी सरफराज खानने झेप घेतली. अजित आगरकर म्हणतो, “त्याला १००...

इंग्लंडच्या आगामी पाच सामन्यांसाठी शुबमन गिल यांना षभ पंत नावाचे नाव देण्यात आले. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी कबूल केले की रोहित शर्मा, विराट...

तारीख बियाणे कॉफी म्हणजे काय आणि प्रत्येकजण अचानक त्यास का वेड लावतो

कॉफीच्या मजबूत कपबद्दल काहीतरी आहे जे फक्त योग्य वाटते. हे आपल्याला जागे होते, हलवते आणि त्या खोल, टोस्ट सुगंधात आपल्या इंद्रियांना लपेटते. आपल्यापैकी बर्‍याच...

इंग्लंड वि इंग्लंडच्या कसोटी पथकासाठी सरफराज खानने झेप घेतली. अजित आगरकर म्हणतो, “त्याला १००...

इंग्लंडच्या आगामी पाच सामन्यांसाठी शुबमन गिल यांना षभ पंत नावाचे नाव देण्यात आले. मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांनी कबूल केले की रोहित शर्मा, विराट...

तारीख बियाणे कॉफी म्हणजे काय आणि प्रत्येकजण अचानक त्यास का वेड लावतो

कॉफीच्या मजबूत कपबद्दल काहीतरी आहे जे फक्त योग्य वाटते. हे आपल्याला जागे होते, हलवते आणि त्या खोल, टोस्ट सुगंधात आपल्या इंद्रियांना लपेटते. आपल्यापैकी बर्‍याच...
error: Content is protected !!