जवळा येथे दुर्गा विसर्जनादरम्यान 58 वर्षीय व्यक्तीचा पाण्यात बुडून मृत्यू
आर्णी तालुक्यातील जवळा येथे दुर्गा देवीच्या विसर्जनादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली. 13 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी सुमारे 4 वाजताच्या सुमारास, प्रकाश लक्ष्मण राजूरकर (वय 58) यांचा तळ्याच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना दत्त टेकडी मागील तळ्यामध्ये देवीचे विसर्जन करताना घडली.
गावकऱ्यांनी लगेच आर्णी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून गावकऱ्यांच्या मदतीने प्रकाश यांना पाण्यातून बाहेर काढले, परंतु त्यावेळी ते मृतावस्थेत होते. त्यांचे पार्थिव शवविच्छेदनासाठी आर्णी येथे पाठवण्यात आले आहे. पुढील तपास आर्णी पोलीस करत आहे