किन्ही येथे एक गाव एक देवी दुर्गोत्सव मंडळ
आर्णी तालुक्यातील
किन्ही येथे 50 घराचे वस्तीत मातोश्री दुर्गोत्सव मंडळ यांनी जोपासले एक गाव एक देवी
दररोज सकाळी 5 वाजता सर्व गावकरी एकत्र येऊन आरती करतात सकाळी 5 वाजता आरती होत असून सुधा सर्व भाविक भक्त 200 ते 300 च्या प्रमाणत आरती करिता हजेरी लावतात व आरती झाल्यानंतर सर्व भाविक भक्त दररोज एक या नुसार उपवासाच्या नाश्ता ची व्यवस्था करत असतात. व लहान मुले,महिला यांच्या करिता मंडळाकडून दररोज वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात. सर्व समाजाचे नागरिक गुण्या गोविंदाने मातेचे पूजन व आरती करिता उपस्थित राहतात. व बरेच लोक निरंकाळ उपवास सुद्धा करतात. गावातील मंडळाचे कार्यक्रम पार पाडण्यासाठी नितीन ठाकरे,बाबाराव झळके,ईश्वर काळे,सचिन काळे,निलेश राठोड, श्रीराम माडसे,कार्तिक मडावी व सर्व कार्यकर्ते व गावकरी यांचे सहकार्याने सर्व कार्यक्रम चांगल्या पद्धतीनं पार पडत आहेत. त्यामुळे गावात एकोफ्याचे वातावरण तयार झाले आहे.